Share Market Investment - शेअर बाजारात गुंतवणूक का करावी?
June 19, 2025
मंडळी, Share Market Investment का करावी? हा प्रश्न अनेकांना आजही पडतो. सध्या जरी share market मध्ये जबरदस्त चढ-उतार बघायला मिळत आहेत तरीसुद्धा Share Market Investment करणे हा एक अतिशय चांगला पर्याय मानला जातो.
सध्या शेअर बाजार १०० अंकांनी वधारला तर उद्या तो २०० अंकांनी कोसळू पण शकतो. तरीसुद्धा इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हे शेअर बाजारातील हे असे चढ-उतार काही काळापुरतेच राहतात आणि हे चढ-उतार होण्याची कारणं एकदा संपुष्टात आली की शेअर बाजार पहिल्याप्रमाणेच पुन्हा एकदा भरारी घेतो.
तसंच ज्या पातळीवर शेअर बाजार कोसळायला सुरुवात झालेली असते त्यापेक्षा पातळीहून सुद्धा तो जास्त उंचीवर जातो आणि पुन्हा Share Market Investment चं प्रमाणही वाढत जातं.
त्यामुळेच आज आपण बघणार आहोत शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) करण्याची काही प्रमुख कारणे ज्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) ही कायम इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा चांगली आणि फायदेशीर ठरते.
शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) करण्याची कारणं
भविष्याची तरतूद
मंडळी भारतामध्ये आजही खूप जास्त प्रमाणात मुदत ठेव किंवा आवर्तक ठेव पारंपारिक पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते. याचं प्रमुख कारण म्हणजे या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला एक फिक्स व्याजदर मिळतो आणि आपली गुंतवणुकीचे रक्कम सुद्धा सुरक्षित राहते.
मात्र मंडळी जर तुम्ही या दोन्ही पर्यायांचा इतिहास बघितलात तर काही वर्षांपूर्वी या दोन्ही ठेवींसाठी १२ ते १३ टक्के वार्षिक व्याजदर मिळत असे. पण गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही ठेवींच्या व्याजदरामध्ये लक्षणीय घट झालेली आहे आणि भविष्यात ही घट चालूच राहणार आहे.
याउलट शेअर मार्केट हा एक असा पर्याय आहे जो गुंतवणूकदारांना कायम चांगलाच परतावा देत राहील. शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) केल्यास सध्या तरी वार्षिक किमान १२% इतका परतावा गुंतवणूकदारांना मिळतो आहे.
त्यामुळे जर आपण या दोन्ही ठेवी मधून (मुदत ठेव किंवा आवर्तक ठेव मधून) मिळणारा परतावा विरुद्ध शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) केल्यावर मिळणारा परतावा याची तुलना केली तर निश्चितच असं दिसून येईल की शेअर बाजारात गुंतवणूक कधीही चांगलीच आहे.
त्यामुळे भविष्याची तरतूद आपल्याला चांगल्या प्रकारे करायचे असेल तर निश्चितच शेअर बाजारातील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे.
लिक्विडिटी
मंडळी, लिक्विडिटी म्हणजे आपण ज्या पर्यायामध्ये गुंतवणूक करतो त्या पर्यायातून आपल्याला गुंतवणुकीची रक्कम किंवा त्यातला काही हिस्सा मिळवायचा असेल तर तो आपण किती लवकर मिळवू शकतो तो कालावधी मोजायचं परिणाम.
याबाबतीत सुद्धा शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) करणे हा पर्याय बहुतेक इतर सगळ्या पर्यायांपेक्षा जास्त लिक्विडिटी आपल्याला देतो.
हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ
समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि तुम्हाला अचानक त्यातल्या पाच हजार रुपयांची गरज लागली तर तुम्ही तेवढ्याच किंमतीचे शेअर्स विकून अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा पाच हजार रुपये तुमच्या खात्यात मिळवू शकता.
आणि या व्यवहारामध्ये तुम्हाला कुठलाही दंड आकारला जाणार नाही.
याउलट जर तुम्ही फिक्स डिपॉझिट किंवा आवर्ती ठेवी मध्ये एकूण दहा हजार रुपयाची गुंतवणूक केली आहे. आणि तुम्हाला योजनेची मुदत संपायच्या आधी जर त्यातल्या पाच हजार रुपयांची गरज लागली तर तुम्हाला संपूर्ण ठेव आधी मोडावी लागते आणि मग त्यातले पाच हजार रुपये काढून घ्यावे लागतात. म्हणजे तुमची सगळी गुंतवणूक बंद होते.
तसंच या ठेवी मुदतीपूर्वी मोडल्यास त्यावर आपल्याला काही टक्के दंड आकारला जाऊ शकतो.
त्यामुळे पटकन पैसे मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) करणे कधी फायद्याचं ठरतं.
गुंतवणुकीची मर्यादा
मंडळी शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) तुम्ही अगदी शंभर रुपयापासून सुद्धा सुरुवात करू शकता आणि काही कालावधीनंतर तुम्ही तुमची गुंतवणूक हळूहळू वाढवू सुद्धा शकता.
याउलट मुदत ठेवीमध्ये तुम्हाला किमान एक हजार रुपयाची गुंतवणूक ही करावीच लागते आणि आवर्तक ठेवीमध्ये जरी तुम्ही शंभर रुपयापासून गुंतवणूक दरमहा करू शकत असला तरी त्या योजनेची मुदत संपेपर्यंत तुम्हाला दरमहा ती गुंतवणूक करत राहावीच लागते.
या उलट शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काही महिने गुंतवणूक करणं जमलं नाही तर त्यावर तुम्हाला कुठलाही दंड आकारला जात नाही तसंच तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेची सुद्धा कुठलीही मर्यादा शेअर मार्केटमध्ये नसते तुम्ही एका महिन्यात १०० रुपये पण भरू शकता दुसऱ्या महिन्यात तुम्ही १००० रुपये पण भरू शकता आणि ही सवलत तुम्हाला फक्त शेअर मार्केटमध्येच मिळू शकते.
प्राप्तिकरात सवलत
मंडळी तुम्हाला मुदत ठेव किंवा आवर्ती ठेवी मधून जे व्याज मिळतं त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागतो आणि एका ठराविक मर्यादेच्या वर जर वार्षिक व्याज गेलं तर त्यावर टीडीएस सुद्धा घेतला जातो. तसंच या दोन्ही ठेवींच्या बाबतीत जरी व्याज तुमच्या खात्यावर जमा झालं नाही तरीसुद्धा त्यावर तुम्हाला टीडीएस आणि प्राप्तिकर भरावा लागू शकतो.
याउलट तुम्ही शेअर्समध्ये जोपर्यंत तुम्ही विक्री करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही प्राप्तिकर भरावा लागत नाही. तसंच जरी तुम्ही शेअर्सची विक्री केली तरी त्यातल्या फक्त प्रॉफिट मार्जिन वरच म्हणजे खरेदी आणि विक्री मध्ये जो फायदा होतो त्यावरच तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागू शकतो. तसंच जर तुम्ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केलेली असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर प्राप्तिकरात बचत करता येऊ शकते.
परताव्याचा दर
मंडळी, मगाशी आपण बघितलं की तुम्ही शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला किमान १२% तरी परतावा मिळतोच. जो मुदत किंवा आवर्ती ठेवीपेक्षा जवळपास चार ते पाच टक्के जास्त आहे कारण हल्ली या दोन्ही ठेवींमध्ये आपल्याला साडे सहा ते आठ टक्क्यांच्या दरम्यान व्याजदर दिला जातो.
त्यामुळे परताव्याच्या दृष्टीने बघितलं तरी शेअर बाजारातली गुंतवणूक ही कधीही जास्त परतावा देणारीच ठरते.
मंडळी या दोन्ही गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये म्हणजे मुदत किंवा आवर्ती ठेव आणि शेअर बाजारातील गुंतवणूक यांमध्येच तुलना करण्याचे प्रमुख कारण हे आहे की बाकी जे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत ते सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे झालेले आहेत.
यामध्ये रियल इस्टेट किंवा स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन घर इत्यादी मधील गुंतवणूक, अगदी सोन्यातील गुंतवणूक सुद्धा आता सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरची झाली आहे.
Bonds विरुद्ध Share Market Investment
बॉण्ड्स मधली गुंतवणूक सामान्य माणसाच्या अजून आवाक्यात आहे पण भारतामध्ये बॉण्ड्स मधील गुंतवणुकीला अजून म्हणावं तेवढं प्रोत्साहन दिल जात नाही. त्यामुळे बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हवी तेवढी माहिती सहजपणे सामान्य माणसाला मिळत नाही
तसंच बॉण्ड्स मधली गुंतवणूक सुद्धा शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा कमीच परतावा देते असं दिसून आला आहे कारण बॉण्ड्स मध्ये सामान्यपणे ८ ते १० टक्क्यांपर्यंत परतावा आपल्याला मिळू शकतो.
त्यामुळे मंडळी आत्ता सांगितलेल्या मुद्द्यांचा नक्की विचार करा आणि हे मुद्दे जर तुम्हाला पटले तर नक्की शेअर बाजारात गुंतवणूक किंवा Share Market Investment हळूहळू का होईना पण सुरुवात करा ज्यामुळे तुम्हाला स्वतःलाच त्याचा फायदा दिसून येईल.
आणि जर तुम्ही शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक सुरू करणार असाल तर थेट शेअर बाजारात गुंतवणूक न करता आधी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. आणि म्युच्युअल फंडात सुद्धा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करा. ज्यामुळे तुम्हाला एकदम मोठी रक्कम भरावी लागणार नाही. दर महिन्याला अगदी पाचशे रुपयांपासून सुरुवात करून तुम्ही हळूहळू तुमची गुंतवणूक वाढवू शकता.
आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला फक्त पैसे भरावे लागतात; शेअर बाजाराची कुठलीही माहिती तुम्हाला नसली तरी चालते आणि तरीसुद्धा तुमची गुंतवणूक हळूहळू वाढत जाते.
तर मंडळी आज आपण शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) का करावी? याची माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली तर कृपया लाईक करा. तुमच्या मित्र मंडळींबरोबर शेअर करा. धन्यवाद.
0 Comments